Header Ads Widget

कुलगुरूंची मनमानी – चिंतित विद्यार्थी

COVID-19 च संकट दिवसान दिवस वाढत चालले आहे याच पार्श्व भूमीवर 


अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्रा मध्ये राज्य सरकार ने घेतला. परंतु मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णया नंतर परीक्षा  ह्या घ्याव्यच लागतील हे निश्चित झाल आहे 

 परंतु आता राज्य शासनाने व सर्व विद्यापीठांनी परीक्षा ह्या सोप्या पद्धतीने घ्याव्यात हीच ईछा सर्व सामान्य विद्यार्थ्यांच्या मना मध्ये आहे. परंतु विद्यापीठांचे कुलगुरू मनमाणी करतांना दिसून येत आहे. काही वृत्त वहीणींच्या माहिती अनुसार बहुतेक विद्यापीठान कढून MCQ ( Multiple Choice Question ) परीक्षा घेण्याचा विचार केला जात आहे तर अमरावती विद्यापीठ ऑफलाइन परीक्षा घेण्याचा विचार करत आहेत.

परंतु आपल्या कल्पना असेल महाराष्ट्र शासणानेच सर्वोच्च न्यायालया मध्ये अफिडेवीट सादर केल होत की आपल्या कडे ऑनलाइन परीक्षा घेण्याची सोय नाही मग एतक्या कमी कालावधी मध्ये आपन ती व्यवस्था निर्माण केले आहे का..?


    सोबतच MCQ परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या मना मध्ये भीतीच वातावरण आहे कारण याच्या आधी MCQ पद्धतीने विद्यार्थ्यांनी कधीच परीक्षा दिल्या नाही, सोबतच ग्रामीण भागाचा जर आपण विचार केला तर तशी व्यवस्था सुद्धा आपल्या कडे नाही.MKCL चे सेंटर सुद्धा तालुक्याच्या ठिकाणी आहे आणि ते पुरेसे नाही. गावा गावा मध्ये ते उपलब्ध सुद्धा नाही.

मग अशी परिस्थिती असतांना MCQ परीक्षण च हट्टा कश्या साठी...?

   या MCQ प्रणाली मुळे विद्यापीठांच काम भलेही सोपं होणार असेल त्यांना जास्त पेपर सेट करावे लागणार नाही, चेकिंग पण करावी लागणार नाही परंतु विद्यार्थ्यांना या MCQ पद्धती मुळे तान निर्माण होत आहे. या सगळ्या विषयावर विद्यार्थ्यांना, पालकांना किव्हा विद्यार्थी संघटनांना सुद्धा विश्वासात घेतलेला नाही. अश्या नाजुक परिस्तिथी मध्ये सर्वांना विश्वासात घेणं गरजेचं आहे. राज्य शासणा काढून  कढून सांगण्यात येत होत की विद्यार्थ्यांच्या परीक्षा सोप्या पद्धतीने घेतल्या जातील पण नेमकी ही सोपी पद्धत विद्यार्थ्यान करिता आहे की विद्यापीठाण करिता ...?  हे आपण तपासायला हव.

चुकीच्या निर्णय प्रक्रियेमुळे जर विद्यार्थी नापास झाले तर त्यांच एक वर्षाच वाया जाणार नाही तर पुढील वर्ष देखील वाया जाण्याची दाट शक्यता आहे. कारण पुढली परीक्षा कधी होईल हे आताच आपण सांगू शकत नाही. तर ईतर राज्यांन प्रमाणे आपण सुद्धा सोपी पद्धत वापरून परीक्षा घ्याईला नको का...?

     ईतर राज्यांन मध्ये जसे HOME BASED ASSIGNMENT ची सोपी पद्धत वापरण्यात येत आहे. असाइनमेंट ऑनलाइन पद्धतीने ठराविक वेळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सोई अनुसार जमा करण्याची मुभा विद्यार्थ्यांना आहे.

  महाराष्ट्र राज्य शासनाने देखील अश्या सोप्या पद्धतीने परीक्षा घ्यव्यात जेणे करून विद्यार्थ्यांना तान येणार नाही आणि सोप्या पद्धतीने देखील परीक्षा आपल्याला घेता येतील. विद्यार्थ्यांकढे स्टडी मटेरियल नाही सोबतच एतक्या कमी वेळा मध्ये MCQ चा अभ्यास करन सुद्धा शक्य नाही.

    
     केंद्र सरकार ने विश्वास घात केलात्यानंतर मा. सर्वोच्च न्यायायलया कढून सुद्धा न्याय मिळाला नाही, विद्यापीठांच्या कुलगुरूंनी देखील या संदर्भात विद्यार्थ्यांची बाजू समजून घेतलेली नाही पण राज्य सरकार आणि मुख्यमंत्री यांच्या कढून फार अपेक्षा आहेत. मा मुख्यमंत्री आणि मा. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी विद्यार्थ्याच्या आरोग्याचा विचार केलाच आहे आणि कौतुकास्पद साथ विद्यार्थ्यांना आपण मागील काही काळा मध्ये दिली आहे. परंतु विद्यार्थ्यांचा मानसिकतेचा आणि भविष्याचा विचार सुद्धा आपण करायला हवा.   

      ‘’ पुरोगामी महाराष्ट्रा मध्ये विद्यार्थ्यांन वर होणारा अत्याचार कदापि सहन केला जाणार नाही ‘’ 


+91 9405525240

COMMENT & SHARE TO MAXIMUM STUDENTS 


Comments If You Have Any Queries

Our Social Links-
Facebook
Twitter
LinkedIn 
Blog
Istagram
Youtube :
.
#publicspeaker #vaibhavedke #MSWA #MCQExams #AntiStudentNarendraModi
#FinalYearExamNews
Previous Post Next Post

0 Comments